शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही-राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:50 IST

महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा भाजपवर हल्लाबोल : दलालापासून राष्ट्र, राज्य वाचविले पाहिजे

कोल्हापूर : महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार आहे. या दलालांपासून देश आणि महाराष्ट्र वाचविला पाहिजे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी संकलित केलेल्या वह्या शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. त्यावेळी शेट्टी यांनी भाजप सरकारचा पंचनामा केला. आमदार पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, जून महिना आला की, पालकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पोटात गोळा येतो. या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून, अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी संकलित केलेल्या पाच लाखांहून अधिक वह्या मुलांसाठी वाळवंटातील ओअ‍ॅसिस ठरणार आहेत.

भाजपच्या कारभारावर चौफेर टीका करताना शेट्टी म्हणाले, शाळा बंद करून सध्याच्या सरकारमध्ये असलेल्यांचा चंगळवाद पोसण्यासाठी नवे गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. मीदेखील ‘अच्छे दिन’च्या भूलभुलय्याला भुललो होतो; परंतु ‘सर्व शिक्षा अभियान’ बंद आहे, पेयजल योजना ठप्प आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर ‘जैसे थे’च आहेत.

दूध दराचे हे संकट येणार, हे मी आधी दोन वर्षे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांना सांगितले होते. क्रूड आॅईलच्या किमती आवाक्यात असताना ५० रुपये वाढीव दराने पेट्रोल विकले जाते. हे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.यांचं धर्मकार्य अन् भोगतोय आम्ही !न्यूझीलंड, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांत भाकड जनावरे कत्तलखान्याला पाठविली जातात. मात्र, भारतात गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने आम्हाला भाकड जनावरे पोसण्याची पाळी आली. सोडून दिलेली अशी हजारो जनावरे उभे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. यांचे धर्मकार्य होते आणि ते मात्र आम्ही शेतकरी भोगतोय, असे शेट्टी म्हणाले. 

मी विंचू चावल्याचे सांगितलेमारुतीच्या मूर्तीच्या बेंबीत एका मुलाने हात घातला तर त्याला विंचू चावला. त्याने इतरांना मात्र आपल्याला गार लागल्याचे सांगितले. इतर मुलेही गार लागले असेच म्हणू लागली; पण मी खरे बोलणारा आहे. मला यांच्या नादाला लागून खरेच विंचू चावला आहे, असे शेट्टी यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर